पखरण शब्दांची –

Pakhran Shabdanchi

हायकोर्टातील निवृत्त न्यायाधीश रमेश बापट यांचे आत्मकथन. अनेक बदल्यांमुळे जस्टिस बापट यांना बरेच चांगले-वाईट असे अनेक अनुभव आले. त्यातूनच त्यांचा माणूस म्हणून कसा विकास झाला याचं चित्रण ‘पखरण शब्दांची’ या आत्मकथनातून त्यांनी केलं आहे. कायद्याच्या क्षेत्रातल्या लोकांना याचा उपयोग तर होईलच पण सर्वसामान्य वाचकालाही न्यायाधीशाचं जीवन जवळून पाहायला मिळेल.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुख म्हणजे नक्की काय असतं?

Sukh Mhanje Nakki Kaay Asta?

साध्या सोप्या भाषेतील गोष्टीरूप लेखसंग्रह. प्रतिभा गरे यांना आलेले अनुभव, त्यांचं स्वतःचं निरीक्षण चिंतन या सर्वांतून आकाराला हा लेखसंग्रह वाचकांना वाचनानंद देणारा आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वेध मनाचा –

vedh manacha

सध्याच्या अत्यंत वेगवान गती असलेल्या स्पर्धेच्या जगात माणूस स्वत:लाच हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत ‘वेध मनाचा’ सारख्या मनाला आधार देणाऱ्या पुस्तकांची गरज आहे. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून घेतलेला माणसात होत असलेल्या बदलांचा हा आढावा प्रत्येक व्यक्तीसाठी आधारपुस्तक ठरणारे आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्राचीन मराठीतील चरित्रलेखन-


प्रस्तुत ग्रंथात प्रा. डॉ. बोरगावकरांनी या मध्ययुगीन काळातील जुन्या चरित्रलेखनाचा चिकित्सक अभ्यास सादर केलेला आहे. या लेखनाच्या प्रेरणा, उद्दिष्टे, भूमिका सामग्री, लेखन प्रक्रिया व लेखनरूपे यांचा त्यांनी मूलभूत आणि समग्र विचार केला आहे. काही निष्कर्ष काढताना त्यांनी तत्कालीन चरित्रलेखनाचे आदर्श, जीवनविषयक तत्त्वज्ञान व दृष्टिकोण, पूर्वकालीन चरित्रसदृश लेखनाचे संस्कार यांचे भान सोडलेले नाही. चरित्र-आत्मचरित्र वाङमयाच्या चाहत्यांना आणि मराठीच्या विद्याथी व अभ्यासकांना हा प्रयत्न फार मोलाचा वाटेल.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रीमंत गोपिकाबाई पेशवे

Shrimant Gopikabai

श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांच्यावरील रमाकांत देशपांडे यांनी लिहिलेली प्रस्तुत कादंबरी गोपिकाबाईंशी खरी ओळख करून देते. टि. व्ही. सिरिअल, इतर ललित वाङ्मयप्रकार यांतून ऐतिहासिक व्यक्तिरेखा खऱ्याखुऱ्या पद्धतीने समोर येतातच असं नाही मात्र रमाकांत देशपांडे असे कादंबरीकार आहेत की, इतिहास आणि कल्पित यांचा सुयोग्य मेळ घालून कादंबरीच्या माध्यमातून तत्कालीन इतिहासाचा परिचय वाचकांना करून देतात. हेच त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. म्हणूनच त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय होतात. ‘श्रीमंत गोपिकाबाई पेशवे’ ही ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरीही निश्र्चितच वाचकप्रिय होईल.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

न्यूझीलंडच्या माओरींची तोंडओळख

Newzealandchya Maorinchi Tondolakh

न्यूझीलंडचे पहिले रहिवासी माओरी यांच्या जीवनाची थोडक्यात ओळख करून देणारं कल्याणी गाडगीळ यांचं प्रस्तुत पुस्तक कुतूहल निर्माण करणारे आहे. प्रवासवर्णन वाचण्याची आवड असणाऱ्या आणि सहलप्रेमी वाचकांना प्रस्तुत पुस्तक निश्र्चितच आवडेल.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पत्रकारिता नव्या संधी, नवी आव्हाने

patrakarita

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यांचं पत्रकारितेशी असलेलं नातं आणि बंधन यांच्या माहितीच्या आधारे घेतलेला शिस्तबद्ध आढावा म्हणजे अजय कौटिकवार यांनी लिहिलेले प्रस्तुत पुस्तक

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माणूस घडविणारा ग्रंथ दासबोध

Manus ghadvinara

माणूस घडविणारा ग्रंथ दासबोध
श्री रामदास्वामींनी ‘खरा माणूस’ घडविण्यासाठी ‘दासबोधा’सारखा ग्रंथ निर्माण केला. त्यांनी केलेला हितोपदेश आजच्या काळातही
उपयुक्त आणि आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रभाकर नानकर, संगीता शिरोडे आणि नारायण गुणे या लेखकत्रयीचे प्रस्तुत पुस्तक
मार्गदर्शक असून प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्राचा अमृत संकल्प – २०३५ 

Amrutsankalp

महाराष्ट्राचा अमृत संकल्प – २०३५ साल महाराष्ट्र राज्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असेल तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रीलियन डॉलरपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठीचा अमृतसंकल्प सादर करणारा हा भविष्यग्रंथ अविनाश घारे आणि सहकारी यांनी पुस्तकरूपाने वाचक अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. हा विषय घडून गेलेल्या इतिहासाचा विचार करून येणाऱ्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेचा काटेकोर आलेख मांडणारा आहे. या विषयीची मांडणी, भाषा आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अर्थसंकल्पाचा विचार ही या ग्रंथाची बलस्थाने आहेत. महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या प्रत्येक माणसाने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कणाकणाने – 

kanakanane

डॉ. केतन खुर्जेकर यांचे हे आत्मचरित्र म्हणजे ‘सर्जन’शील डॉक्टरचे आणि एका उमद्या व्यक्तीचे अनुभवकथन आहे. डॉ. केतन यांचे मित्र अभय इनामदार यांनी शब्दांकन केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि प्रत्येक वाचकाला प्रेरक ठरेल असे ‘कणाकणाने’ हे आत्मचरित्र प्रकाशनाने हेतुत: प्रकाशित केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जो भजे सूर को सदा –

jo bhaje sur ko sada

आज संगीतक्षेत्रातील तीन प्रतिभाशाली आणि नामवंत शास्त्रीय संगीत गायक शौनक अभिषेकी, आनंद भाटे आणि राहुल देशपांडे यांचा सांगीतिक प्रवास सांगणारे हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने नव्या उमेदीच्या नवोदित गायकांसाठी आणि सर्व रसिक वाचकांसाठी देखण्या, आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. शास्त्रीय संगीतामध्ये कारकीर्द बनवण्यासाठी कोणते आणि कसे कष्ट घ्यावे लागतात याचं रंजक पद्धतीने मार्गदर्शन करणारं पुस्तक नव्या पिढीला करून द्यायला हवं या हेतूने प्रकाशनाने ‘जो भजे सूर को सदा’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाभारताच्या यज्ञकुंडातील आहुती

‘सत्यरथी विकर्ण’

 Satyarthi Vikarna

महाभारत हा ग्रंथ माणसातल्या प्रकृती आणि विकृतींचा प्रवास असणारा एक चलचित्रपटच आहे. त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर अनेकविध लेखकांनी लेखन केले आहे. या अभिजात ग्रंथाचा मोह आजच्या काळातल्या लेखकांना अजूनही पडतो आहे. उदय जोशी यांची ‘सत्यरथी विकर्ण’ ही कादंबरी म्हणजे त्यांना महाभारत ग्रंथाच्या पडलेल्या मोहातून निर्माण झालेल्या साहित्यकृतीचे सुंदर आविष्करण आहे. ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


भारतीय जनता पक्ष : काल आज आणि उद्या

BJP

आर्य समाजापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ ते भारतीय जनता पार्टी असा राजकीय पक्षाचा प्रवास जनसामान्यांना कळावा यादृष्टीने प्रस्तुत ग्रंथ संग्रही बाळगावा असा आहे. मूळ लेखक शांतनू गुप्ता यांच्या इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद मल्हार पांडेसारख्या तरुण कार्यकर्ता असलेल्या लेखकाने केला आहे ही एक विशेष गोष्ट आहे. मराठी साहित्यक्षेत्रात तरुणांनी अशा पद्धतीने उत्तम योगदान देणे ही आजच्या काळात महत्त्वाची आणि विशेष घटना आहे. ‘‘भारतीय जनता पक्ष काल आज आणि उद्या’’ हा प्रस्तुत अनुवादित ग्रंथ राज्यशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिक या सर्वांसाठी उपयुक्त ग्रंथ आहे.

 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेघदूत

Meghdoot

सर्वश्रेष्ठ कवी कालिदास यांचे ‘मेघदूत’ हे सर्वांगसुंदर काव्य आणि त्याच्यावरील रसाळ आस्वादक लेख अशा स्वरूपाचं सुंदर, मोहक पुस्तक डॉ. विजया देव यांनी लिहिलं आहे. सुप्रसिद्ध कवी सलील वाघ यांची सुरेख प्रस्तावना या पुस्तकाला अधिकच उठावदार करते. मनाला आनंद देणारे हे ‘मेघदूत’ पुस्तक आवर्जून प्रत्येक रसिक वाचकाने संग्रही ठेवावे असे आहे.

 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भवचक्र

Bhavchakra

प्रियांका कर्णिक यांनी इतिहासकाळाचा वेध घेऊन, त्या कालखंडातील महत्त्वाच्या घटनांशी हा प्रवास जोडून घेताना दाखवलेलं लेखन-कौशल्य वाचकांना लेखिकेच्या अभ्यासू वृत्तीचं दर्शन घडवतं.

कादंबरी साधारणत: तीन टप्प्यांमधून पुढे सरकते. इतिहास काळातून पुढे येऊन पुढील दोन टप्प्यांमधील लेखन करताना प्रियांका कर्णिक यांचं भवतालाचं निरीक्षण कामी येतं आणि ‘भवचक्र’ परिपूर्ण होतं.

एकूणच ‘भवचक्र’ लेखिका प्रियांका कर्णिक यांच्या विषयीच्या भविष्यकाळातील अपेक्षा उंचवणारी कलाकृती ठरते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी कथेची स्थितिगती

Marathi Kathechi Sthitigati

मराठी कथेचा इतिहास सांगणारं आणि मराठे कथेची चिकित्सक समीक्षा करणारं संदर्भपुस्तक. डॉ. अंजली सोमण यांनी प्रस्तुत पुस्तकातून हरिभाऊंपासून आजच्या कथाकारांपर्यंतच्या कथांचा समीक्षात्मक अभ्यास केला आहे. विद्यार्थी, अभ्यासक यांच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक संदर्भपुस्तक म्हणून अतिशय उपयुक्त आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ही भूमी नक्की कोणाची?

Hi Bhumi Nakki Konachi

या पुस्तकात सनी पाटोळे यांनी इस्राएल व पॅलेस्टाईन या राष्ट्रांच्या भूमीसंदर्भात चाललेल्या वादाची इस्राएलच्या बाजूने भूमिका मांडून, ती भूमी कशी इस्राएलची परमेश्वराने दिलेली वचनदत्त भूमी आहे, हे सप्रमाण पटवून दिले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठीतील काव्यरंग

Marathitil Kavyarange

काव्यरसिक, अभ्यासक, समीक्षक अशा सर्वांना उद्‌बोधक ठरणारा समीक्षाग्रंथ. मराठी साहित्याच्या या नवीन कालखंडातील अनेक प्रतिभावंत कवी तसेच संतकवी यांच्या रचना आणि त्यांचे रसग्रहण अशा स्वरूपाचा हा समीक्षाग्रंथ श्रीनिवास हवालदार यांनी लिहिला आहे. कविता समजावून सांगणारा हा ग्रंथ वाचक अभ्यासकांना निश्र्चितच उपयुक्त ठरणारा आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ॲक्रॉस लॅटिन अमेरिका

across latin america

निसर्गअभ्यासक अनिल दामले यांचं हे ननवे पुस्तक. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून भटकंतीला सुरुवात केली. आजतागायत दामले भटकंती करत आहेत. या भटकंतीच्या अनुभवांची भली मोठी शिदोरी त्यांच्यापाशी जमा झालेली आहे. त्यातलंच प्रस्तुत पुस्तक होय. वाचकांना घरबसल्या प्रवासाचा आनंद मिळवून देणारं हे पुस्तक आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रे सावळ्या घना

re sawalya ghana

कालिदासाच्या मेघदूतातील यक्षाची संपूर्ण कथा सांगणारी रोचक कादंबरी. मेघदूताचा हा केवळ अनुवाद नाही तर कादंबरीसाठी मेघदूताचा उपयोग लेखक विश्र्वनाथ राजपाठक यांनी करून घेतला आहे त्यामुळे कादंबरीतल्या यक्षाचं स्वरूप सर्वसमावेशक झालं आहे. एकूणच ही कादंबरी वाचनीय आणि उत्कंठावर्धक झाली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कुरतडलेल्या कथा

Kurtadlelya Katha

चमचमाटी बॉलिवुडमधील सत्याच्या आधारानं लिहिलेल्या कथांचा काळजाला स्पर्शून जाणारा कथासंग्रह.
मराठी व हिंदी चित्रपटक्षेत्र म्हणजे माणसाच्या स्वप्नांचा व्यवसाय करणारं ‘बिग बजेट’ क्षेत्र. या क्षेत्रातल्या काळ्या-पांढऱ्या बाजूंविषयी लोकांना अतिशय कुतूहल असतं त्यामुळे त्यांच्याविषयीच्या कथा वाचायला वाचकांना निश्र्चितच उत्सुकता वाटेल. श्रीकांत धोंगडे यांनी ‘कुरतडलेल्या कथा’ या कथासंग्रहात बॉलिवुड क्षेत्रातल्याच हृदयस्पर्शी कथा सांगितल्या आहे. साधी सरळ ओघवती शैली हे धोंगडे यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. या संग्रहातील कथांमधील व्यक्तिरेखा वाचकमनामधे अगदी खोलवर प्रभाव टाकतात.
‘‘काळीज कुरतडणारं सत्य’’ सांगणारा हा कथासंग्रह वाचकांना निश्र्चितच भावणारा आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

‘भारुडातील वादळ चंदाताई’

Bahrudatil Vadal

‘भारुडातील वादळ चंदाताई’ हे पुस्तक म्हणजे भारुडाच्या माध्यमातून संकीर्तनाची पताका खांद्यावर घेऊन अध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधन घडविणाऱ्या एका कर्तृत्ववान महिला कलावंताची वास्तववादी चरित्र कथा आहे. अध्यात्म आणि लोकाचार, काव्य आणि नाट्य, लोककला आणि लोकभूमिका, अभिदा आणि लक्षणं, उद्बोधन आणि प्रबोधन यांचा समन्वय साधणारी भारुडे म्हणजे लोकजीवनाच्या अनुभवविश्वाची एक उत्कट अभिव्यक्ती होय.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऊस शेती

Oos Sheti

डॉ. मिलिंद भुजबळ लिखित ‘ऊस शेती’ हे माहितीपर पुस्तक विद्यार्थी आणि शेती करण्यास उत्सुक असणाऱ्या अशा सर्वांना मार्गदर्शक व उपयुक्त आहे. ऊस लागवड करण्याची शास्त्रीय पद्धती, त्यातल्या अडचणी, त्यांवरील उत्तम याची सखोल माहिती प्रस्तुत पुस्तकाद्वारे मिळते. एक उपयुक्त मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाचे महत्त्व.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

फळप्रक्रिया

Falprakriya

बाजारात मिळणारी फळे कशी निवडावीत, कोणत्या फळामध्ये कोणते सत्व असते, फळांपासून कोणकोणते टिकाऊ पदार्थ केले जातात यांविषयीची सविस्तर माहिती प्रस्तुत पुस्तकात दिली आहे.