सी बी आय च्या अंतरंगात

CBI chya antarangat

माजी सी. बी. आय. संचालक जोगिंदरसिंग यांच्या पुस्तकाचा अनुवाद वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी केला आहे. पोलिसक्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रस्तुत पुस्तक मार्गदर्शक आहेच परंतु वाचकांसाठीही हे पुस्तक कुतूहल निर्माण करणारे रंजक झाले आहे.

आमचा वानप्रस्थ

Amcha vanprastha

आमचा वानप्रस्थ
‘केसरी’ या वर्तमानपत्रातून पं. महादेवशास्त्री जोशी यांची ‘माझा वानप्रस्थ’ ही लेखमाला १९८२ मधून प्रसिद्ध होत होती. १९८३ मधे कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. वाचकांसाठी ती पुन्हा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. प्रस्तुत
लेखसंग्रहातून तत्कालीन ग्रामीण परिसरातील दुष्ट रुढी, सामाजिक आर्थिक व्यवहार या साऱ्याचे सुरेख चित्रण केले आहे. अतिशय
वाचनीय असा हा लेखसंग्रह आहे.

___________________________________________________

प्रतिनिधी

Pratinidhi

प्रतिनिधी – मानवी अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या उत्तम कादंबऱ्यांमधे वसंत वरखेडकर यांच्या १९७१ मधील ‘प्रतिनिधी’ या कादंबरीचा उल्लेख आवर्जून करता येईल. ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. दि. पुंडे यांनी प्रस्तुत कादंबरीला नावाजले आहे. अस्तित्ववादी कादंबऱ्यांची सुरुवात करणाऱ्या कादंबऱ्यांमधील प्रस्तुत कादंबरी महत्त्वाची कादंबरी म्हणता येईल असे डॉ. पुंडे यांनी म्हटले आहे. १९७१ नंतरच्या काळातील सामाजिक, राजकीय परिस्थिती, मानवी मनाची अस्वस्थता या साऱ्यांची विलक्षण एकसूत्रतेने गुंफण लेखकाने कादंबरीत केली आहे. आजच्या काळातही वाचकाला बौद्धिक आनंद देणारी वसंत वरखेडकर यांची ‘प्रतिनिधी’ ही कादंबरी आवर्जून वाचावी अशी आहे.

___________________________________________________

उमाजी राजे मुक्काम डोंगर –

Umaji Raje

रामोशी जमातीत जन्मलेल्या दिसायला सौम्य परंतु अंगी नाना कळा असणाऱ्या, प्रचंड धाडसी अशा उमाजी राजे नाईक यांचं चरित्र सदाशिव आठवले यांनी लिहिलं आहे. उमाजी राजे यांचं विलक्षण व्यक्तिमत्त्व आठवले यांनी प्रस्तुत पुस्तकातून वाचकांसमोर उभं केलं आहे.

___________________________________________________

गड आला पण सिंह गेला –

Gad Aala

छत्रपती शिवाजीराजे यांचा उजवा हात सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची कथा सांगणारी कादंबरी ह. ना. आपटे यांच्या गाजलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांपैकी प्रस्तुत कादंबरी नव्या आकर्षक स्वरूपात वाचकांसमोर आली आहे.

 ___________________________________________________

समग्र काव्यवाहिनी

Samagra Kavyavahini

रा.श्री.जोग आणि कुसुमाग्रज यांनी अर्वाचीन कवितांचे संपादन ‘काव्यवाहिनी’चे चार खंडातून केले आहे. या चार खंडांचे एकत्रीकरण करून ‘समग्र काव्यवाहिनी’ असा एक खंड कविताप्रेमींसाठी, अभ्यासक – विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. केशवसुतांपासून संजीवनी मराठेंपर्यंतच्या कवितांचा समावेश प्रस्तुत खंडात आहे.

 ___________________________________________________

विचारशलाका

Vicharshalaka

श्री.म.माटे यांच्या सामाजिक, वाङ्‌मयीन, व्यक्तिपर, विज्ञानपर निबंधांचा समावेश त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात आहे. श्री.म.माटे यांचे लेखन नेहमीच प्रेरणा देणारे आणि संस्कार करणारे असते. आजच्या पिढीलाही त्यांचे हे लेखन उपयोगी ठरेल म्हणूनच नव्या स्वरूपात ‘विचारशलाका’ पुस्तक उपलब्ध करून दिले आहे.

___________________________________________________

चांदणी–

Chandani

ॲना सीवेल या इंग्लंडनिवासी लेखिकेच्या जगप्रसिद्ध ‘ब्लॅक ब्यूटी’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीची लोकप्रियता रसिकवाचक जाणून आहेत. शं. रा. देवळे यांनी ‘ब्लॅक ब्यूटी’चं ‘चांदणी’ नावानं केलेलं रूपांतरही मूळ कादंबरीइतकं मोहक, वाचनीय आणि भावस्पर्शी आहे. बाल-कुमारांना संस्कार देणारं हे मराठी रुपांतरित पुस्तक प्रत्येक पालकानंही वाचायला हवं. मराठी भाषेचे संस्कार घडवणारं आणि गोडी लावणारं हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.

___________________________________________________

कँटरबरी कथा –

Canturburry kata

चौदाव्या शतकातील जेफ्री चॉसरच्या ‘कँटरबरी टेल्स’ या इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद रमेश मुधोळकर यांनी केला आहे. बालकुमारांना संस्कार करणारे हे पुस्तक त्यांना निश्र्चितच आवडेल.

 

 

पुनर्मुद्रित चार पुस्तके

खास कुमारांसाठी अनुवादित पुस्तके

  •          टॉम जोन्स

  •          नदीकाठची चक्की

  •          कँटरबरी कथा

  •          चांदणी

 

शौर्यकथा, इंग्लंडमधल्या यात्राकथा, ब्लॅक ब्यूटी सारख्या अद्‌भुतरम्य आत्मचरित्रात्मक कादंबरीचा अनुवाद अशा विविध अनुवादित पुस्तकांचा खजिना कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने बालकुमारांसाठी मुद्दाम उपलब्ध करून दिला आहे.

___________________________________________________

आमची कथा

Aamchi Katha

दुर्गाबाई देशमुखांच्या ‘चिंतामण ॲण्ड आय’ या इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद कुसुम कुलकर्णी यांनी केला आहे. चिंतामणराव देशमुख व दुर्गाबाई देशमुख या राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुप्रसिद्ध दांपत्याचं परिपूर्ण जीवनचरित्र वाचकांना, कार्यकर्त्यांना प्रेरक ठरते.

___________________________________________________

नदीकाठची चक्की

Nadikathchi Gacchi

कुमारांसाठीचे वाचनीय पुस्तक. खास कुमारगटातील मुलांकरिता जॉर्ज एलियटच्या ‘मिल ऑन दि फ्लॉस’ या इंग्लिश कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद वामन पात्रीकरांनी केला. विलक्षण जिवंत अनुभव देणारी ही कादंबरी मुलांनी अवश्य वाचावी अशी आहे.

कथा भागवत

katha bhagwat

भागवत ग्रंथाचे बारा स्कंध आहेत. या ग्रंथात भक्तांच्या रंजक कथा आहेत. त्या बोधप्रद आहेत. भागवतात काव्य, तत्त्वज्ञान आणि कथा आहेत. या सर्वांचा परिचय शं. रा. देवळे यांनी करून दिला आहे. मुलांसाठीच्या ह्या संस्कार कथाच होत. तसंच तरुण पालकांसाठीही मार्गदर्शक कथा म्हणून प्रस्तुत पुस्तक महत्त्वपूर्ण आहे.

___________________________________________________

अर्वाचीन मराठीतील खंडकाव्ये 

Arvachin Marathitil Khandakavye

सन 1850 ते 1950 पर्यंत दोनशेहून अधिक खंडकाव्ये, काही निवडक खंडकाव्यांची संस्कृत व इंग्रजीतून मराठीत भाषांतरे - रूपांतरे प्रसिद्ध झाली. परंतु, प्रस्तुत ग्रंथात खंडकाव्याचे विविध प्रकार (ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, कल्पनारम्य इ.) त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास, खंडकाव्याची अंतर्बाह्य कलात्मक वैशिष्ट्ये 1850 ते 1950 मधील खंडकाव्यांचा सखोल परामर्श घेतला आहे. “नाट्यकाव्याचे (वीरारींळल श्रूीळली) विकसित व विस्तृत स्वरूप म्हणजे खंडकाव्य” हा साहित्यशास्त्रीय तात्त्विक विचार सर्वप्रथम याच ग्रंथात मांडला गेला आहे.

मानवी जीवनात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडी होत राहणार व मानवी संस्कृतीला नवनवीन वळसे घ्यावे लागणार, त्यानिमित्त वाङ्मयीन भाष्ये, खंडकाव्येही होत राहतील अशी खात्री वाटते. ‘खंडकाव्य’ हा उपेक्षणीय वाङ्मयप्रकार नसून अभ्यासपूर्ण समालोचन करण्याचा प्रकार आहे. म्हणूनच जरूरीचा हा ग्रंथप्रपंच!

___________________________________________________

गाडगीळांच्या कथा

Gadgilanchya Katha

श्री. पु. भागवत संपादित ’ या संग्रहात नवकथाकार गंगाधर गाडगीळ यांच्या निवडक कथांचा समावेश आहे. श्री. पुं. ची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संपादित संग्रहाला समीक्षात्मक ग्रंथाचे रूप आले आहे. त्यामुळे अभ्यासक, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या संपादित संग्रहाचे मोल फार मोठे आहे. रसिक वाचकांनाही हा संपादित ग्रंथ पुन्हा नव्या स्वरूपात वाचायला नक्कीच आवडेल.

___________________________________________________

इब्सेन

Ibsen

नार्वेजियन नाटककार हेन्रिक इब्सेन याच्या साहित्यसंपदेवरील अभ्यासपूर्ण समीक्षात्मक ग्रंथ. तत्कालीन रंगभूमी आणि इब्सेनची नाटके यासंबंधीचे सखोल विवेचन करणारा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ आजही अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी तसंच नाट्यप्रेमी वाचकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

 

 ___________________________________________________

कालापुढती चार पाऊले

Kalapudhti Char Paule

कै. शंतनुराव हे विसाव्या शतकातील एक महापुरुष होते. त्या शतकाच्या उत्तरार्धातील, स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक विकासामधील त्यांचे योगदान अपूर्व असे होते. त्याची नोंद इतिहासात होण्याच्या दृष्टीने आणि भावी पिढ्यांना त्यापासून स्फूर्ती मिळण्यासाठी त्यांचे समग्र चरित्र जनतेसमोर येणे आवश्यक होते आणि ती कामगिरी श्री. सविता भावे यांनी या ग्रंथरूपाने समर्थपणे पार पाडली आहे.

 ___________________________________________________

माझे चिंतन

Maze Chintan

प्रा. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे म्हणजे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील एक श्रेष्ठ विचारवंत होते. त्यांच्या प्रस्तुत पुस्तकात आपल्या समाजाच्या उणिवा, त्यावरील उपाय तसेच आपला देश उन्नतावस्थेला कसा जाईल याचे सोदाहरण विवेचन लेखकाने केले आहे. राष्ट्रोन्नतीसाठी अत्यावश्यक विषयांचे सांगोपांग केलेले हे विवेचन वाचकाला अंतर्मुख करते.

 ___________________________________________________

तौलनिक साहित्याभ्यास

Taulanik

प्रा. म. द. हातकणंगलेकर यांचा हा गौरवग्रंथ आहे. गणेश देवी, भालचंद्र नेमाडे, अनिरुद्ध कुलकर्णी, अविनाश सप्रे, वीणा आलासे, सुमथीन्द्र वडिग, चंद्रकांत बांदिवडेकर यांच्यासारख्या इतरही समीक्षक विद्वान यांचे वैचारिक लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट आहेत. अभ्यासक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असा हा समीक्षाग्रंथ आहे.

 ___________________________________________________

समांतर जीवन

Samantar Jeevan

सुप्रसिद्ध लेखिका सुनीता देशपांडे यांचं समांतर जीवन हे आगळंवेगळं पुस्तक कुतूहल निर्माण करणारे आहे. डिकन्स आणि जार्ज एलियट हे कादंबरीकार, कालॉइल, रस्किन व मिल हे सामाजिक विचारवंत यांचं जीवनचित्रण सुनीताबाईंनी अतिशय सुरेख केलं आहे. खूमासदार शैलीतलं सुनीताबाईंचं हे पुस्तक वाचकांना निश्र्चितच आवडणारं आहे.

 ___________________________________________________

सुभाष

Subhash

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे केळकरांनी लिहिलेले हे चरित्र म्हणजे त्यांच्या उज्जवल स्मृतीला केलेला प्रणाम आहे. नेताजींसारख्या क्रांतिकारक योद्‌ध्याचे चरित्र आजच्या काळातल्या मुलांसमोर सतत असणे अत्यावश्यक आहे. अशी क्रांतिचरित्रे आजच्या काळाची आत्यावश्यक गरज आहे.

___________________________________________________

मराठ्यांचा इतिहास – अ. रा. कुलकर्णी

Marathyancha Itihas

कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या ग्रंथदालनातील वैभवशाली ग्रंथपरंपरेतील ‘मराठ्यांचा इतिहास’ हा एक संग्राह्य ग्रंथ. या ग्रंथाचे तीन खंड एकत्रित नव्या आकर्षक रूपात कॉन्टिनेन्टलने वाचक, अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

___________________________________________________

माता द्रौपदी – नाटक

Mata Draupadi

विद्याधर पुंडलिक यांचे पहिले नाटक. महाभारतातील द्रौपदी या व्यक्तिरेखेतून जाणवलेल्या काही गोष्टींचं मुक्त चिंतन पुंडलिकांनी लेखकाचे कल्पना स्वातंत्र्य घेऊन केलेले आहे. विजया मेहतांसारख्या मेहनती दिग्दर्शिकेने रंगायतनतर्फे या नाटकाचा प्रथम प्रयोग केला होता.

___________________________________________________

बिकट वाट वहिवाट – नाटक

Bikat Waat

व्यंकटेश माडगूळकरांचे हे सामाजिक नाटक. हिंदू मुलीनं मुसलमान मुलाशी लग्न ठरवलं तेव्हाची सामाजिक घडामोडी, माणसाच्या मनाची अवस्था, पोटची पोर म्हणून नाकारणं या साऱ्याचं संयतशील आणि विचारप्रवृत्त करणारं चित्रण माडगूळकरांच्या या नाटकातून दिसतं.

___________________________________________________

तू वेडा कुंभार – नाटक

Tu Veda

व्यंकटेश माडगूळकर यांचे हे ग्रामीण जीवनाविषयीचं चिंतन व्यक्त करणारं नाटक आहे. भौतिक जीवनाचा विकास होत गेला तसं माणूसपण कमी कमी होत चाललं असल्याचं चिंतन माडगूळकरांनी या नाटकात व्यक्त केलं आहे.

___________________________________________________

पानिपतची मोहीम

Panipatchi Mohim

ना. वि. बापट यांची ही कादंबरी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांनी संक्षिप्त स्वरूपात वाचकांसमोर आणली. पानिपतच्या मोहिमेवरची ही उत्कंठावर्धक कादंबरी.

___________________________________________________

पाच कथाकार

Pach Kathakar

प्रस्तुतच्या ‘पाच कथाकार’ मध्ये दोन महायुद्धांच्या दरम्यान निर्माण झालेल्या कथेचा आलेख वाचकांसमोर कथांद्वारा ठेवण्याचा प्रयत्न आहे. वाचकांना तो फार आवडलाही आहे. या संकलनाच्या, प्रदीर्घ प्रस्तावनेत वि. स. खांडेकरांनी कथा ह्या साहित्यप्रकाराची मराठी कथेच्या संदर्भात सखोल चिकित्सा केली आहे, त्यामुळे हे पुस्तक रसिकांप्रमाणेच अभ्यासकांनाही भावले आहे.

___________________________________________________

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे समग्र दर्शन घडवणारा इतिहास या ग्रंथात इ. स. पू. २३५ ते इ. स. १९४७ या सुमारे बावीसशे वर्षांच्या काळातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विवेचन केले आहे.
महाराष्ट्र संस्कृतीच्या इतिहासाचे सातवाहन ते यादवकाळ, बहामनीकाळ, मराठा काळ व ब्रिटिश काळ असे चार विभाग पडतात. यातील पहिला काळ स्वातंत्र्याचा, पराक्रमाचा, विद्या, व्यापार, कला यांच्या उत्कर्षाचा काळ होता. दुसरा बहामनी काळ हा पूर्ण पारतंत्र्याचा काळ होता. स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्न देखील कुणी केलेला दिसत नाही. यानंतरचा काळ म्हणजे मराठा काळ. या काळाचे मोठे वैभव म्हणजे मोगल सत्तेचे निर्दाळण होय. हिंदुत्वाचे रक्षण हे या काळातील मराठ्यांचे अलौकिक कर्तृत्व म्हणता येईल. यानंतरचा ब्रिटिशांचा काळ हा पारतंत्र्याचा असूनही वैभवशाली ठरला याचे कारण प्रारंभापासून महाराष्ट्राने स्वातंत्र्याची अपेक्षा धरून पाश्र्चात्य विद्यांचा अभ्यास करून स्वातंत्र्यलढ्याची तयारी चालवली होती. स्वातंत्र्याकांक्षा व पाश्र्चात्त्य विद्या यांमुळे तत्कालीन जागृती होऊ लागली आणि त्यांची अस्मिता जागृत झाली. त्यातूनच मानवी कर्तृत्व उदयास आले आणि स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्याची प्रेरणा भारताला मिळाली.
असा रोचक आणि माहितीपूर्ण इतिहासग्रंथ पु. ग. सहस्रबुद्धे लिहून आजच्या काळातील तरुण पिढीवर एकप्रकारे संस्कारच केले आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयाने वाचलाच पाहिजे असा हा ग्रंथ आहे.

___________________________________________________

. . . रावसाहेब स. के. नेऊरगावकर यांनी तुकाराम महाराज यांच्या सार्थ गाथेतील अभंगांचे विवरण त्या त्या अभंगांच्या खाली दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकाला तसंच साधकांनाही हा गाथा मार्गदर्शक ठरतो. महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या संग्रही हा गाथा असणं ही अभिमानाची गोष्ट आहे.

___________________________________________________


महाराष्ट्राचे थोर तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांनी ‘गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ’ म्हणून जावडेकरांच्या ‘आधुनिक भारत’ या ग्रंथाचा गौरव केला होता. प्रत्येक संशोधक, अभ्यासकाला मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ प्रकाशनाने नव्या देखण्या स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे.

___________________________________________________

    


मराठी माती आणि किनारा हे कुसुमाग्रजांचे कवितासंग्रह नव्या आकर्षक स्वरूपात रसिक वाचकांसाठी प्रकाशनाने उपलब्ध केले आहेत.

___________________________________________________

सौंदर्यवादी कवी माधव ज्यूलियन्‌ यांच्या निवडक कवितांचे कवी गिरिश यांनी संपादन केलेले उत्कृष्ट पुस्तक ‘स्वप्नलहरी’

___________________________________________________

वि. वा. शिरवाडकर लिखित ‘जान्हवी’ कादंबरी पुन्हा वाचकांसाठी उपलब्ध

___________________________________________________

वि. स. खांडेकर लिखित कथासंग्रह ‘नवा प्रात:काल’

___________________________________________________

श्री. म. माटे यांनी सांगितलेल्या अंतरंगातल्या गोष्टी ‘उपेक्षितांचे अंतरंग’

___________________________________________________

Meshpatre

मेषपात्रे

(किंमत १२५/-) (पृष्ठे - १४६)

चिं. वि. जोशी लिखित दहा विनोदी नाटिका आणि एकांकिका

___________________________________________________

swakare

स्वकरे चंदन घाशी

(किंमत १२५/-) (पृष्ठे - १२८)

संत एकनाथांची चरित-कथा

___________________________________________________

bhagwatottam

भागवतोत्तम संत एकनाथ

(किंमत ३००/-) (पृष्ठे - ३३२)

संत एकनाथांच्या वाङ्मयीन, धार्मिक आणि सामाजिक कार्याचे तौलनिक व यथार्थ मूल्यमापन या प्रबंधात आढळेल.